2. Click Verify below. expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> Karmaveer bhaurao patil : April 2020

Friday, April 17, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सुविचार

                                   सुविचार

  1)   शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने  माणूस विवेकी बनतो. 

  2)    सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल  पण  तुमचे यश देखील कायमचेच झोपेल. 

  3)    गुरुपेक्षा  शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे. 

   4)    कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची  किंमत वाटत नाही. 
    
  5)   स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद आहे. 

  6)   मिळवा व शिका. 

  7)   मला ओसाड जमीन द्या मी त्याचे नंदनवन बनवतो. 

  8)   विद्यार्थ्यांनी फक्त डोक्यावरची केस वाढवायचे नसतात.  तर त्यांनी डोक्यातले सुविचार वाढवायचे असतात. 

  9)  आपल्या भावी पिढीची जवाबदारी स्त्रीवर्गाकडे असल्यामुळे स्त्रियांना प्रथम  सज्ञान करणे फार जरुरीचे  आहे. 

 10)   काम करीत असताना हा गरीब हा, हा श्रीमंत असला भेदभाव  घामाच्या  धारांबरोबर गळून पडतो. 

 11)   शिक्षण हे साध्य नाही साधन आहे. नवचैतन्य नवसंस्कृती  नवमानव नि नवसमाज शिक्षणातून निर्माण करायचा असतो. 

  

Photos event of bhaurao patil--1



     Laxmibai bhaurao patil and Karmaveer.                                  bhaurao patil



      Krantisinh nana patil and Karmaveer
                                bhaurao patil




                   Karmaveer bhaurao patil 
Orphaned children and karantisinh Nana patil 

Photos event of bhaurao patil -2


Dr. Ambedkar With Saint Gadge baba (social reformer from vidarbha)and Karmaveer bhaurao patil (famous educationist and social worker from    satara ) ,Dadasaheb Gaikwad.




                 
(4th jan 1954 ) Karmaveer bhaurao patil ,babasahab  Ambedkar ,Mai Ambedkar and bhaurao pendharkar ( as jyotirao phule ) and Acharya Atre- at the launch of film "mahatma phule " produced and directed by Acharya Atre.

             

Dr. Babasaheb Ambedkar with Karmaveer bhaurao patil (left) and Sant gadge maharaj  (center )in July 14 , 1949


Sunday, April 12, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील

Subscribe                


 जन्म         :  22  सप्टेंबर, इ. स  (1887)
                         कुंभोज, महाराष्ट्र


 मृत्यू          :  9 मे, इ. स (1959)


टोपण नाव  : कर्मवीर 


  पेशा          :  समाजसुधारणा, शिक्षणप्रसार


 प्रसिद्धकामे  : रयत शिक्षण संस्था 


 मुळगाव       :   कुंभोज 


 पुरस्कार       : पद्मभूषण (1959)

रयत गीत






रयतगीत-
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||

कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||

गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||

दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||

जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ

कर्मवीरांचे चरित्र

                             
                                 
कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंअसेडा पाटील  होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणार्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.
इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थान चे राजे राजर्षी शाहू महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.
एकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेतकर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वताजाव्ल बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूर ला नेऊन 'मिस क्लार्क होस्टेल'लादाखल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या 'मूकनायक'वर्तमान पत्राचा तोकाही काल तो संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आई ने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.

कर्मवीरांची वंशवेल


महानिर्वाण

                          महानिर्वाण

           लोकजागृतीसाठी, शिक्षणप्रसारासाठी  आणि संस्थेला मदत गोळा करण्यासाठी भाऊराव आयुष्यभर अनवाणी पायानी व  उघड्या माथ्याने उन्हापावसातून हिंडत होते. त्याच्या प्रकृतीवर  याचा परिणाम जाणवू लागला. ते  तेवरचेवर आजारी पडू लागले. संधीवात,  रक्तदाब व रुदय विकार यांच्या उपचारासाठी त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले होते.  हॉस्पिटल मधून बाहेर पडताना मिळालेला विश्रांतीचा सल्ला त्यांनी कधीच पाळला नाही.  बाहेर पडले  की कार्यरत होऊन जाते.सन 1959 मध्ये  उपचारासाठी ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले.  यापूर्वी हृदयविकाराच्या अनेक झटक्यातून ते सावरले होती.  डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा किमान दहा वर्षे ते अधिक जगले होते.  केवळ इच्छाशक्ती बाळावर. ता. 9मे 1959 रोजी हृदयविकाराचा झटका येऊन भाऊरावांचे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये निधन झाले.  निधनसमयी त्यांच्या  मृत्यूशय्येजवळ  त्यांचा एक हरिजन  विद्यार्थी होता. 

Saturday, April 11, 2020

सामाजिक कार्य

                          सामाजिक कार्य

 1)   महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज          चळवळीत  सक्रिय सहभाग व प्रभावी नेतृत्व.

2)      अस्पूश्याता निवारण मोहिमेत हातभार व आघाडीचे            सहकार्य

3)   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन           सेवक संघ या संस्थेचे सक्रिय सहभाग

4)  सामाजिक ऐक्य, न्याय, बंधुभाव  व हरिजनोद्धार                यासाठी वाहून घेतलेल्या श्री. गाडगे महाराज मिशन मुंबई       या संस्थेत  सहभाग.

5) थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी               स्थापन  केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन चे विश्वस्त.

6)  मुंबई राज्य बॉकवर्ड क्लास वेल्फेअर   बोर्डाचे  सदस्य

7)  सर दोराबजी टाटा ट्रस्ट रुलर वेल्फेअर बोर्डाच्या                   सहकार्याने देवापुर ता. माण जि. सातारा परिसरातील 9          गावांची सर्वांगीण विकास योजना कार्यान्वित.

8) हरिजनांसाठी स्थापन केलेल्या संत चोखामेळा धर्मशाळा,      पंढरपूरचे विश्वत.

9) शशिकला सॉनिटोरियम (टी. बी हॉस्पिटल ) जयसिंगपूर         जि.  कोल्हापूर या संस्थेचे विश्वस्त.

10) पुणे येथे सामाजिक समता व न्याय यासाठी भारलेल्या          सामाजिक  परिषदेत  सक्रिय सहभाग.

11) सातारा डिस्ट्रिक डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य.

12) रुलर डेव्हलपमेंट बोर्ड साताऱ्याचे सदस्य.

13) हरिजन सेवेसाठी स्थापन केलेल्या जिल्हा बोर्डाचे                 सदस्य.

14) विविध उद्योगधंद्यातील कामगारांचे हिताचे जपवणूक            त्यासाठी  संघटना बांधणी, कामगारांच्या मुलामुलींची             शिक्षणाची  व्यवस्था यासाठी जाणीवपूर्वकसातत्याने            प्रयत्न. 

Friday, April 10, 2020

भाऊराव पाटील



भाऊराव पाटील 
(सप्टेंबर २२इ.स. १८८७; ८, महाराष्ट्र - मे ९इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.[१] ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वस्तीग्रह मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणार्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.


इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थान चे राजे राजर्षी शाहू महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.




एकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेतकर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वताजाव्ल बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूर ला नेऊन 'मिस क्लार्क होस्टेल'लादाखल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या 'मूकनायक'वर्तमान पत्राचा तोकाही काल तो संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आई ने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.अण्णास्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला.